Ad will apear here
Next
मंचल
आजच्या बदलत्या काळाचे प्रतिबिंब नव्या लेखकांच्या लेखनात उमटत आहे. दीप्ती मडी यांच्या ‘मंचल’ मधील कथाही काळसुसंगत आहेत. पंडितजींबरोबर संसार करणारी, पण त्यांच्या गानसाधनेचा भाग नसलेली त्यांची पत्नी वसुधा व मुलगा अनुराग यांचे एक वेगळे जग निर्माण होते. पंडितजींच्या निधनानंतर त्यांचे स्मारक पट्टशिष्य जगदीशच्या मदतीने उभारले जाते. त्याच वेळेस नातू श्रेयस गायला बसतो. अन एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे समाधान वसुधाला ‘नांदी’तून मिळते.

‘विराणी’त चित्रा व अभयची नाटकाच्या ऑडिशनला भेट होते. ती त्याच्यात गुंतते. विवाहनंतरही तिचे जग त्याच्यापाशीच घुटमळत राहते. तिने आपल्यावर पूर्णपणे विसंबून न राहता स्वत:चे जग निर्माण करण्यास तो तिला सांगत असतो. त्याच्या आकस्मिक निधनानंतर ती हरवूनच जाते; पण अमृता तिला त्यातून बाहेर काढते अन अभयची ‘चित्राणी’ त्याच्या सावलीतून बाहेर येते. शमा-अजित व त्यांचा अमेरिकेत शिकणारा मुलगा आशू यांचे एक वेगळेच नाते ‘मैफिल’मधून पाहायला मिळते.

पुस्तक : मंचल
लेखक : दीप्ती मडी
प्रकाशक : लिटर्रेजर पब्लिशर्स
पाने : १२४
किंमत : १५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZRPBW
Similar Posts
मंचल - मनाच्या चलबिचलीच्या कथा ‘माझं पुस्तक, एखादं सुंदर गाणं आणि तुमची कॉफी हे एक असं विलक्षण जग निर्माण करण्याची माझी इच्छा आहे. हे पुस्तक जसं माझ्या मनात रेंगाळालं तसं ते तुमच्याही मनात रेंगाळावं,’ अशी भावना या कथासंग्रहातील कथांमध्ये आहेत. दीप्ती मंडी यांच्या चार कथांचा हा संग्रह आहे. पहिल्या ‘नांदी’ या कथेत प्रगल्भ वसुधा समोर येते
मनात रेंगाळणाऱ्या कथा मानवी मनाचे विविध कंगोरे उलगडून दाखवणाऱ्या चार दीर्घकथा दीप्ती मडी यांनी ‘मंचल’ या कथासंग्रहाद्वारे वाचकांसमोर आणल्या आहेत. ‘मनातल्या चलबिचलीच्या कथा’ असं या पुस्तकाचं उपशीर्षक असलं, तरीही या कथांमधून त्यातील पात्रांच्या विचारांमध्ये असलेला ठामपणा आपल्याला जाणवतो. या कथासंग्रहाचा हा परिचय...
‘कथा हा सामान्य वाचकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग’ पुणे : ‘अगदी गर्भात असल्यापासून ते लहानपणी गोष्ट सांगत, ऐकत मोठे होण्यापर्यंत आपण कथेतच रमतो. कथा आपल्याला शिकवतात, प्रेरणा देतात. त्यामुळे कथा हा सामान्य वाचकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो,’
ही व्यवस्था काय आहे? गंभीर आणि महत्त्वपूर्ण विषयांवर राजीव कालेलकर यांनी केलेले विचारप्रवृत्त करणारे हे लेखन. या पुस्तकातील लेखांमध्ये अपंगत्व, दलित, स्त्रीप्रश्न, मैत्री, संगीत, मार्क्सवाद, संस्कृती इत्यादींवर भाष्य केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language